शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

समाधान मिळाल्याचं समाधान...


श्रीमंताघरचा नोकर होणं आवडेल की गरीब घरचा मालक…? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर त्याचं उत्तर असेल गरीब घराचा मालक...हो ना ? असं उत्तर देताना स्वाभिमान...आभिमान वैगेरेचा विचार करूनच कुणीही उत्तर देईल पण घरात पाऊल ठेवल्यावर आशाळभूतपणे वाट पाहणारी आपली मुलं-बाळं आपल्या चेहऱ्याकडे पाहून हसतील आणि नंतर आपल्या चेहऱ्यावरून त्यांची नंजर हळूहळू खाली सरकत आपल्या मोकळ्या हातांकडे वळेल तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे सामर्थ्य आपल्या त्या (मोकळ्या) हातात असेल का..?
शेवटी काय....तर एका मर्यादेनंतर पैशांची गरज असतेच...आपण नेहमी मंदिरात जातो तसेच पुन्हा एकदा जा..? अगदी नेहमीप्रमाणे पहाटे अंघोळ वैगरे करून मंदिराच्या रांगेत जाऊन ऊभे राहा....हार-फुले, नारळ यापैकी काहीही न घेता तास-दोन तासांच्या रांगेतील प्रतिक्षेनंतर मंदिरात पोहोचा...मनोभावे दर्शन घ्या...आरती वैगरे म्हणा...आणि बाहेर पडा...मंदिराबाहेर पडून नेहमीप्रमाणे मागे वळून मंदिराच्या कळसाकडे पाहून नमस्कार करा...आणि हे सर्व करून समाधान किती मिळालं याचा विचार करा....त्यानंतर विचार करा की नेहमी हार फुले-नारळ वाहून मिळणारं समाधान जास्त असतं की आजच्या (कोरड्या) देवदर्शनानं मिळालेलं समाधान जास्त....आपसुकच हार-फुले-वाहून केलेल्या देवदर्शनातून मिळणारं समाधान मोठं असतं असं आपल्यासला वाटेल...शेवटी देवदर्शन कशासाठी....आपल्या मनाच्या समाधानासाठीच ना..?नदीच्या पात्रात उभं राहून सूर्याला अर्ध्वयू कलेलं आपण सिनेमांमधनं नेहमी पाहतोच ना...पण मला सांगा...सूर्याला अंघोळ घालण्याच्या या विधीतून सूर्यापर्यंत पाण्याचा एक थेंब तरी पोहोचतो का..? पण त्यानं आपल्या मनाची मात्र अंघोळ होते...नाही का..? आणि मग समाधानासाठी हार-फुले-नारळ घ्यायला हवीत हे मग मनोमन पटतं....पण मग मनाच्या समाधानाची गाडी पुन्हा येऊन थाबंते ती (हार-फुले-नारळ घेण्यासाठी लागणाऱ्या) पैशांच्याच स्टेशनवर...नाही का..?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा