शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

गोष्ट उध्वस्त झालेल्या आटपाट नगरीची....


एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल आणि ती मिळवण्याची इच्छा आपण अव्यक्तपणे आकांडतांडव न करता वर्षानुवर्ष मनोमन जपली असेल...नवस सायास केले असतील आणि ती आपल्याला मिळाली नसेल किंबहुना कधीच मिळणार नसेल तर ती गोष्ट दिसली तरी मनाचा थयथयाट होतो. मनाची घालमेल असह्य होते. म्हणून ती गोष्ट आपल्याला दिसू नये किंवा या ना त्या कारणाने त्या गोष्टीचा साधा संपर्कही होऊ नये म्हणून तजवीज केली तर बिघडलं कुठं? कुणाला वाटेल हा मानसिक रूग्ण आहे...कुणाला प्रश्न पडेल हा असा का वागला किंवा वागतो? कुणी म्हणेल हा मुडी आहे...मुड असेल तेव्हा बोलतो...नसेल तेव्हा भांडण करतो....पण ज्याचे दु:ख त्याला कळे...जावे त्याच्या जन्मा तेव्हा कळे...ज्या गावात घर नाही...गावात जाण्याच्या रस्त्याला भेगा पडल्यायत त्या गावी कशाला जायचं ? बस्स...या विषयावर फार काही लिहता येत नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा